पोस्ट्स

या फुलांच्या गंधकोषी ......मसाई पठारावरची नाजुक रानफुलं आणि अंतुऱ्याची फुलं

इमेज
                                                                                                                     ।।श्री।।    यावेळच्या कोल्हापुर महालक्ष्मी आणि ज्योतिबा च्या दर्शना दरम्यान च्या प्रवासात दोन नाजुक आणि या आधी कधीही नं पाहिलेली फुलं दिठीस पडली!  इथे दिठी हा माऊलींचा शब्दं आवर्जून योजावासा वाटला, इतकी  ती फुलं नाजूक साजूक आणि गोड होती, की बघितली, दिसली, पाहिली यातलं काहीच म्हणावासं वाटलं नाही!                       रविवारी सकाळी कोल्हापूर पासून जवळ असलेल्या मसाई पठारावर रप्पस पाऊस आणि जोरदार वारा असतांना, चालतांना तिथली नाजूकशी पांढरी पांढरी एकटी दुकटी फुलं दृष्टीस पड...

वारीची वार्ता 🌱🌱

इमेज
                                                                                  ।।श्री।।                                                                                                        अधिक देखणे तरी निरंजन पाहणे।                                             योगीराज विनवणे मना आले वो माये ।।   ...

प्रिय नचिकेत,

इमेज
  प्रिय नचिकेत,  खरतर आज तुझा fb वाढदिवस आणि लगेचच नंतर खर्रा खरा वाढदिवस असायचा!! शुभेच्छा तुला दोन्ही दिवशी मिळायच्याच,शुभाशिर्वाद हे मात्र खऱ्या वाढदिवसाला मोठ्या नातेवाईक मंडळींकडून मिळायचे! जूने मित्र आठवणीने कॉल करून शुभेच्छा द्यायचेच,पूर्वी तर अनेकदा त्यांनी लांबून लांबून ग्रिटींग कार्ड्स ही पाठवलेलं,मला आजही आठवतं!! तुला एकदा स्वामींनी अमेरिकेतून अल्का कडून -तुझ्या चुलत बहिणी कडून - थेट शिकागोतुन दोह्याला  शुभेच्छापर फ़ोन केला होता आणि मी आपल त्यांना सांगितल, स्वामी आज त्याचा fb वाला बड्डे आहे, तर स्वामींची कमाल ही की त्यांनी पुन्हा आठवणीने तुझ्या खऱ्या वाढदिवशीही,एवढ्या व्यापामधून लक्षात ठेवून पुन्हा कॉल केला आणि विशेष शुभाशिर्वाद दिले - अशी गुरु माऊली लाभण हे आपल सद्भाग्य!!  वाढदिवस साजरा करण्यातल्या आपल्या दोघांच्या उत्साहाचं प्रमाण मात्र व्यस्त होतं!!!! तुला कधी फार उत्साह नसायचा, मग तो तुझा वाढदिवस असो की माझा - माझा वाढदिवस लक्षात ठेवून, सकाळी शुभेच्छा दिल्यास की तु मनोमन ‘हुश्श!’ करताना कळायच,सुरुवातीला जरासं वेगळं वाटलं तरीही नंतर नंतर याचीच सवय झाली ह...

एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽

इमेज
  आज ६ मे २०२४  हा दिवस मनावर कायमचा कोरलेलाच आहे,आणि या जन्मी तरी तो निश्चितच स्मरणात असेल! आजच्या दिवशी ४० वर्षांपूर्वी एक पुण्यात्मा परमात्म्यात विलीन झाला! आज तर माझ्या दृष्टिने हा फारच महत्वाचा दिवस आहे, मधे ही अनेकदा मनात आलं, जगाच्या दृष्टीने सं पलेली तीनही सख्खी माणसं,आता कदाचित पुन्हा एकदा सुदूर अवकाशात एकमेकांना भेटली असतील, एकमेकांना बघून, ऐकून, बोलून, भेटून  तृप्त झाली असतील !!??  ४० वर्ष, १७ वर्ष आणि अजून काही महिनेच झालेली व्यक्ती यांची सांगड कशी घालता येते किंवा येते का, हा हिशेब तो एक जगन्नीयांतच जाणे !! पण पन्नाशी उलटल्यावर ही आईची तीव्र आठवण नचिकेत ला कित्येकदा आलेली मी बघत होते, वडिलांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला ही मीच साक्षीदार होते!! सगळं एकदम छान सुरू असतांना, आणि एका उत्तम हुद्द्यावर, उत्तम पगारावर, उत्तम देशात, अगदी - आज माझी west bay ला ११४ व्या मजल्यावर मीटिंग आहे वंदना - कुठला टाय आणि सुट घालू ते जरा सांग - अशा परिस्थितीत, नुसतच आई वडिलांना miss करण एवढच नाही, तर आपल्या मुलीत कुठेतरी आपली आई शोधणं, ‘काय हो साहेब, खूष आहात...

मनातला हिरवा चाफा

  मनातला हिरवा चाफा 🌳 लहान असतांना शाळेला जाणारी वाट ही इतक्या सुंदर गोष्टींनी भरलेली होती की शाळेत जाता-येता रस्ता कधी संपायचा कळायचंच नाही!! घरासमोरचं आईने स्वच्छं शेणसडा- रांगोळी घातलेलं अंगण, अंगणात कायम फुलं देणारी  चांदणीची दोन झुडुपं आणि पेरुचं,बोरांचं, बिट्टीचं, पांढऱ्या चाफ्याचं अशी झाडं! नंतर जरा पुढे गेलं की उन्हाळ्याचे दोन महिने सोडल्यास कायम वाहती असलेली आमची उल्हास नदी, कर्जतला जातांना नदीवरच्या पुलावरुन आणि शाळेत जातांना नदीच्या बाजुने पुढे असं मज्जेत चालणं सुरु व्हायचं. नदी सोडून पुढे गेलं की,उजवीकडे दोन छोटी छोटी मंदिरं आणि डाविकडे अडुळशाच्या झुडुपांची रांग,त्यांची फुलं तोडून देठातला मध चाखण्यातला आनंद काही औरच, जरा चार पावलं पुढे आलं की  वड आणि पिंपळाचे मोठ्ठे पार आणि दोन्ही अगदी गावाचे रक्षक असल्यासारखे मोठ्ठे वृक्ष, त्यांच्या सावलीतून पुढे आलं की विठृठल-रखुमाई आणि रामाच्या मंदिराचं आवार,ते मागे टाकलं की शाळेच्या वाटेवर असलेल्या एका घराच्या( मेढींचं घर) अंगणाच्या अगदी कोपऱ्यात एक हिरव्या चाफ्याचं बुटकसं झाड होतं, त्याला अगदी एखादा जरी  चाफा लागला ...
                                                                             आज खऱ्या अर्थाने .......                                             १२. ११.२३  माझ्या सासऱ्यांना म्हणजे डॉ. बाबा अलुरकरांना जाऊन आता उणीपुरी १६ वर्ष झाली. २४मे २००७ ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आम्ही सगळे लातूरला त्यांनीच स्थापन केलेल्या विवेकानंद हॉस्पिटल मध्ये जमलो होतो, ते त्यांचं सगळ्यात आवडतं बाळ होतं. तन-मन-धन सारच त्यांनी स्वप्रेरणेने आणि स्वकष्टाने उभारलेल्या हॉस्पिटल मध्ये ओतलं. दैवयोग हा कि त्यांची प्राणज्योत ही अखेर तिथेच शांत झाली,आणि त्यांच्या हि कैक वर्ष आधी आईची - त्यांच्या शरुची ही प्राणज्योत तिथेच मावळली.  बाब वारले आणि दोनच दिवसांनी नचि...
                                                                                                                                                                                                              २४-१०-२३   प्रिय नचु                                                                  ...